Sarpanch Pagar In Maharashtra: माझ्या सर्व मित्रांनो, आपल्या गावातील सरपंचांना पगार मिळतो किती हे प्रत्येक गावातील प्रत्येक नागरिकांना माहिती असणे आवश्यक आहे, कारण सरपंच म्हणजेच त्या गावचा प्रमुख. परंतु खुप सर्व व्यक्तींना गावातील सरपंच आणि उपसरपंचांना पगार किती मिळतो हे माहिती नसते, तर आज आपण या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला सरपंच आणि उपसरपंचांना पगार किती व कसा मिळतो या संदर्भात माहिती देणार आहे, नक्कीच हा लेख तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल, मग मित्रानो हा लेख नक्की व शेवटपर्यंत वाचून घ्या..
Sarpanch Pagar In Maharashtra
सर्व मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व सरपंचांच्या मानधनात वाढ करण्याबाबत शासनाकडून एक निर्णय 30 जुलै 2019 रोजी घेण्यात आला. या शासनीय निर्णयाच्या माध्यमातून सरपंच आणि उपसरपंच यांच्या मानधनात किंचित वाढ करण्यात आली आहे.
अशी माहिती विविध माध्यमातून देण्यात आली आहे. या लेखात आपण थोडक्यात तो शासन निर्णय जाणून घेऊया.
महाराष्ट्रातील सर्व सरपंचाच्या मानधनात वाढ करण्याबाबत, मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व सरपंच संघटना व सर्व लोकप्रतिनिधीनीं वेळोवेळी केलेली मागणीनुसार व सध्याच्या महागाईहिला लक्षात घेऊन आणि तसेच सरपंचाचे जे कर्तव्य असतात त्या कर्तव्यामध्ये म्हणजेच कामामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे आणि हे सर्व विचारात घेऊनच सरपंच मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता आणि शासनाकडे ही मागणी सुद्धा केली होती.
अनेक लोक या प्रश्नात आताही असतील की सरपंच्याना पगार किती असतो, तर मित्रानो सरपंच किंवा उपसरपंच यांना पगार ते कुठल्या गावात आहे त्या प्रमाणे असते. जसे जर त्यांचे गाव ग्रामीण आहे की शहरी किंवा प्रगतिशील आहे यावरून. सामान्यतः सरपांच्याना पगार 10 ते 20 हजार महिना असतो. आणी सोबत काही फायदे हि त्यांना भेटतो.